Login

तिचे कर्तव्य..(भाग ३अंतिम)

सासर माहेर दोन्ही जबाबदाऱ्या उत्तमरीत्या सांभाळून आज खऱ्या अर्थाने दोन्ही ठिकाणी तिने खरा विजय मिळवला होता.


तिचे कर्तव्य -माहेरवाशीण
(जलद कथामालिका लेखनस्पर्धा)

मागील भागात आपण पाहिले, सासूच्या आणि नवऱ्याच्या विरोधाला न जुमानता आरती माहेरी गेली. आजारी आईची सर्व काळजी घेतली. एका माहेरवाशिणीचे खरे कर्तव्य तिने पार पाडले. आता पाहुयात पुढे....


दुसऱ्या दिवशी आईला थोडे बरे वाटू लागले. हे पाहून आरतीला देखील बरे वाटले. आईचे खाणेपिणे, औषधपाणी सारं काही ती जबाबदारीने करत होती. बहीण भाऊ सारे फोन करुन आईची वारंवार विचारपूस करत होते. अधूनमधून सुट्टी असेल तेव्हा बहिणी यायच्या आईला भेटायला. फक्त भावाला यायला नाही जमायचे. कारण नोकरीनिमित्त तो अनेक वर्षापासून दुबईला होता.

पण आरतीच्या भावाने आईसाठी कायमची दुबई सोडण्याचा निर्णय घेतला. आणि मुंबईमध्ये नवीन जॉब शोधला होता त्याने. आरतीला तसे त्याने कळवले.

"तू काळजी करु नकोस, तुझी ओढाताण समजते आहे मला. शेवटी तू पण सासुरवाशीणच आहे, तरीपण माहेरच्या जबाबदाऱ्या देखील हिमतीने पेलतेस. मी आई बाबांना घेवून आता मुंबईला सेटल होण्याचा निर्णय घेतला आहे. तुझी ओढाताण नाही होणार आता."

भावाची आई वडिलांप्रती असलेली काळजी पाहून आरती मनोमन सुखावली. चार दिवस माहेरी राहून ती सासरी परतली.
मात्र घरात तिच्याशी कोणीच नीट बोलेना. मुले मात्र आई आई करत आरतीला येवून बिलगली. नवऱ्याने तर तिच्याशी अबोला धरला. पण तरीही ती सासरीदेखील तिचे कर्तव्य बजावत होती. मग कोणी कसे का वागेना.

पुढे दोन महिन्यांनी भावाचा तिला फोन आला. सासूने दुरुनच अंदाज बांधला.
"आता पुन्हा पडली हीची आई आजारी. जा आता पुन्हा माहेरी. पण ह्यावेळी कशी जाते? ते मी पण बघतेच."
अर्धवट बोलणे ऐकून  सासू बाहेर निघून गेली.

आरतीचा भाऊ त्याच्या फॅमिलीसह मुंबईत सेटल झाला होता. दोन दिवसांतच तो आई बाबांना देखील तिकडे घेवून जाणार होता. हेच सांगायला त्याने फोन केला होता.

फोन ठेवला नि आरतीला रडूच आवरेना. आता वरचेवर आई बाबांना भेटता येणार नाही या विचारानेच ती कोमेजली. तेवढ्यात सासूने येवून अविचाराने तिला बोलायला सुरुवात केली.

"ह्यावेळी जर का तू माहेरी गेलीस तर मीही माझ्या धाकट्या लेकाकडे निघून जाईल. कर मग तुला काय करायचे ते."
प्रचंड तोंडसुख घेतले नेहमीप्रमाणे सासूने.

"आई नका काळजी करु, आता नाही मी सारखं सारखं माहेरी जाणार. तुमची चिंता मिटली हो आता. दादाने मुंबईत घर घेतलं आहे. नोकरीही शोधली आहे आणि आई बाबांना दोन दिवसांत घेवून जाणार आहे तिकडे. त्यामुळे आता माझ्याशी या गोष्टी वरून तरी वाद घालण्याची गरज नाही पडणार तुम्हाला."

आरतीचे बोलणे ऐकून सासूचे डोळे चमकले. आता काय बोलावे? ते सासूलाही समजेना. कारण आरतीप्रमाणेच तिचा भाऊ देखील त्याचे कर्तव्य नव्हता विसरला. पण परिस्थितीपुढे तोही हतबल होता.

सासूची बोलती बंद झालेली पाहून आरती म्हणाली,
"आई मग काय ठरवलंय? धाकट्या लेकाकडे जाण्याबद्दल बोलतेय मी."

आरतीने सासूला बरोबर टोमणा मारला.

सासूला आता स्वतःचीच लाज वाटत होती. कारण तिचा धाकटा मुलगा मुंबईतच होता. पण एकदाही आई वडिलांना तिकडे या म्हणून शब्दाने कधी विचारले नाही त्याने. नातवंडांना सांभाळायलाही त्याच्या सासूबाई होत्या कित्येक दिवस. आणि आताही आहेत कारण सून नोकरी करते मग मुलांना सांभाळायला तिच्या माहेरचेच लोक आहेत.

सासूला आता सारे काही समजले होते. आता खरी आरतीची किंमत तिला समजली होती. आपण किती फायदा घेत आहोत आरतीच्या चांगुलपणाचा, याची मनात कुठेतरी जाणीव झाली सासूला. पण आता खूप उशीर झाला होता. सुनेला जेव्हा खरी गरज होती सासूची तेव्हा सासू फक्त वाद घालत राहिली तीच्यासोबत.

पण आता चूक सुधारण्याची संधीही सासूला मिळणार होती लगेचच. कारण पुढे काही दिवसांतच दिवाळसण होता. सासूने स्वतःहून आरतीला विचारले, "तुला माहेरी नाही जायचे का?
मुलांना सुट्टी लागली की जा तू माहेरी. इकडची काळजी नको करू. मी आहे, सांभाळेल सर्व."

सासूच्या या प्रेमळ बोलण्याने आरती मनोमन सुखावली. इतक्या वर्षात आज पहिल्यांदा सासू आरतीसोबत अशी प्रेमाने बोलली. आधी माहेरी जाण्यावरुन वाद घालणारी सासू आज स्वतः माहेरी जाण्याबद्दल बोलत होती.

दिवाळीला भाऊ आरतीला घ्यायला आला. सासूनेदेखील आनंदाने तिला भावासोबत पाठवले. भवाला देखील आरतीच्या सासूचे आजचे हे प्रेमळ रूप खूपच भावले. आई आणि आरतीमधील गैरसमज दूर झालेले पाहून अविनाशदेखील मनोमन सुखावला.

यावर्षी पहिल्यांदा आईने आणि भावाने आरतीचे माहेरपण आनंदाने जपले. सगळी भावंडे इतक्या वर्षांनी एकत्र आली होती. आनंदाची दिवाळी सर्वांनी मिळून साजरी केली. लग्नानंतर इतक्या वर्षांनी पहिल्यांदा माहेरवाशीण म्हणून आरती मिरवत होती. आई, भाऊ, भावजय, बहिणी सारे मिळून तिचे, तिच्या मुलांचे लाड पुरवत होते. कारण माहेरप्रती आतापर्यंत सर्वांत जास्त आरतीने तिचे कर्तव्य आणि जबाबदारी निभावली होती. आणि म्हणूनच ही आनंदाची दिवाळी आज सर्वांना मिळून साजरी करता आली.

"तिचे कर्तव्य" तर तिने चोखपणे पार पाडले होते आणि आता सर्वजण मिळून त्याचीच कधीही न करता येणारी परतफेड करत होते जणू.

समाप्त..

कशी वाटली कथा? अभिप्राय द्यायला विसरू नका.

धन्यवाद...

©® कविता वायकर

*****

" केतन, चल लवकर. मला उशीर होईल. आणि हो ती बॅग पण घे सोबत. " मंजुषा केतनला म्हणजेच आपल्या धाकट्या दिराला बोलत होती.

केतन पटकन बॅग घेऊन वहिनींसोबत निघाला. माधुरी मात्र डोळ्यात पाणी घेऊन स्वयंपाक घरात निघून गेली. केतन - माधुरीच्या लग्नाला तीन महिने झाले होते. मंजुषा या घरात लग्न करून आली त्यावेळी केतन कॉलेजमध्ये शिकत होता. त्यामुळे दोघात छान मैत्री झाली. घरीसुद्धा सर्वाना ही गोष्ट छान वाटली.

मात्र केतनच लग्न झाल्यापासून मंजुषा जरा जास्तच केतनवर हक्क दाखवत होती. माधुरीने कुठे बाहेर जायचा प्लॅन केला की मंजुषा काहीतरी कारण काढून त्यात खोडा घालायची.

एकदा माधुरी आणि केतनने मूवीला जाण्याचा प्लॅन केला. माधुरीला तयार होताना पाहून मंजुषाला लक्षात आल की यांचा बाहेर जाण्याचा प्लॅन आहे. तिने केतन घरात येताच आपल्या मुलावर ओरडायला सुरुवात केली, " तुझ्या पप्पाना सांगून कंटाळाले आहे. तुझ्या क्लासमध्ये जायला. पण हे मनावर घेतील तर ना ? आठवडा झाला. आता जर आज पण नाही गेले तर तुला क्लासमध्ये बसू देणार नाहीत. मग परीक्षेत काय लिहिणार ? "

माझी मेली कामे संपतच नाहीत. जाऊ दे. मीच का करू ? कळू दे तुझ्या पप्पाना पण, मुलाकडे पण थोडं लक्ष दयायला हवं ते. "

वहिणीचं बोलणं ऐकून केतन लगेच म्हणाला, " वहिनी तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी जातो त्याच्यासोबत. त्याचं क्लास मध्ये बसणं गरजेचं आहे. त्यामुळे केतन पुतण्याला घेऊन तडक क्लासमध्ये गेला. हा सर्व प्रकार माधुरी समोरच घडला. माधुरीला तिच्या लग्नाचं नवेपण अनुभवायला मिळतच नव्हतं.

आज पुन्हा तेच झालं. माधुरी आणि केतन बाहेर जाणार होते. खूप दिवसात फिरायला गेले नव्हते म्हणून जास्त नाही पण जवळ पार्कमध्ये वेळ घालवणार होते आणि नंतर जेवून घरी येणार होते. पण मंजुषाला अंदाज येताच तिने केतन घरी येताच सांगितलं, " केतन आई खूप दिवस झाले बोलवतेय. आज जरा निवांत वेळ आहे. तर मला घेऊन चल. संध्याकाळपर्यंत परत येऊ आपण. "

केतनही लगेच तयार झाला. त्यात माधुरीला समोर पाहताच मंजुषा मुद्दाम म्हणाली," केतन, चल लवकर. मला उशीर होईल. आणि हो ती बॅग पण घे सोबत. "

माधुरीला खूप राग आला. यावर लवकर तोडगा काढावा लागेल. हे तिला कळून चुकलं. दोघेही गेल्यावर माधुरी बराच वेळ बाल्कनीत उभी राहून विचार करत होती. तेवढ्यात तिला तिचे मोठे दीर येताना दिसले. आणि माधुरीच्या डोक्याची बत्ती पेटली. ती पटकन जाऊन आत हॉलमध्ये बसली.

डोअरबेल वाजताच डोळ्यात अश्रू आणि पडक्या चेहऱ्याने तिने दरवाजा उघडला आणि मुद्दाम तिने डोळे पुसल्यासारखं केलं. ते पाहून सचिनने म्हणजेच मोठ्या दिराने काळजीने तिला " काय झालं? " म्हणून विचारलं. आधी तिने मुद्दाम टाळाटाळ केली पण नंतर म्हणाली, " भाऊजी, आता काय सांगणार तुम्हांला ? लग्न फक्त नावाला झालं आहे माझं. लग्न झाल्यापासून एकदाही केतन मला बाहेर घेऊन गेला नाही, की मूवीला नेलं नाही. नवेपण नाहीच. असं वाटत आई वडिलांकडे होते ते काय वाईट होत ? किमान मला काय हवं नको, माझी इच्छा, याची कोणातरी दखल तरी घेत होत.

आता मन मारून जगतेय. मी काही ठरवलं की याला काहीतरी काम असतंच. आज बघा ना. आम्ही ठरवलं होत बाहेर जायचं पण वहिनीला माहेरी घेऊन गेला हा. आता वहिनींच माहेर आहे अर्ध्या तासावर. याआधी सुद्धा वहिनी एकट्या जायच्या ना. पण नाही. केतन मुद्दाम गेला त्यांना घेऊन, कारण त्याला माझ्यासोबत वेळ घालवायचाच नाहीये.

मी पुरती कंटाळले आहे. घरी असते तर दादासोबत शॉपिंगला तरी गेले असते. पण इथे तर माझं घर वाटतच नाही. "

हे सर्व ऐकून सचिनला खूप वाईट वाटलं. एक मुलगी एवढी स्वप्न घेऊन या घरात आली. तिला अजून ' आपल घर ' वाटत नसेल तर कसं होईल. काहीतरी विचार करून सचिन म्हणाला, " माधुरी एक काम कर. जा तयार हो. तू म्हणाली होतीस ना ? तुझ्या दादासोबत शॉपिंगला गेली असतीस. मी पण तुझा भाऊच आहे. चल मी नेतो तुला शॉपिंगला. हवं तेवढं शॉपिंग कर. तसही केतन, मंजुषा आणि मुलं तर नाहीत. मग आपण बाहेरच जेवून सुद्धा येऊ. "

माधुरीच्या डोक्यात असलेला प्लॅन पुढे सरकत होता. तिला माहित होत.

पूर्ण वाचा लिंकवर
कथा: मर्यादा
https://irablogging.com/blog/maryada_44900

0

🎭 Series Post

View all