माझी कादंबरी
जिवापाड...! प्रेम ! !
कादंबरीकार: सुनिल पुणेTM 93598 50065
प्रकरण १ : वयाच्या पलीकडचं प्रेम
रात्रीचे साडेअकरा वाजले होते.
पावसाचे थेंब खिडकीवर आदळत होते.
सुनिलच्या छोट्याशा भाड्याच्या खोलीत अंधार होता. फक्त मोबाईलचा प्रकाश चेहऱ्यावर पडत होता.
अचानक फोन वाजला.
"मनिषा "
सुनिलच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं.
"हॅलो..."
"जेवलास?"
मनिषाचा पहिला प्रश्न.
"हो."
"खोटं बोलतोयस."
"कसं काय?"
"कारण तुझा आवाज सांगतोय."
सुनिल गप्प झाला.
मनिषा हलक्या आवाजात म्हणाली,
"सुनिल... किती दिवस झाले मला ओळखून?"
"चार वर्षे."
"मग?"
"मग काय?"
"मग माझ्याशी खोटं का बोलतोस?"
सुनिलने दीर्घ श्वास घेतला.
"आज पगार झाला नाही."
"म्हणून?"
"म्हणून जेवलो नाही."
फोनच्या दुसऱ्या टोकाला काही क्षण शांतता पसरली.
मग मनिषाचा रागीट आवाज आला.
"तुला स्वतःची काळजी आहे की नाही?"
"अगं..."
"गप्प बस."
"मनिषा..."
"गप्प म्हणजे गप्प."
दोन मिनिटांनी तिचा मेसेज आला.
"GPay Check."
सुनिलने उघडून पाहिलं.
पाच हजार रुपये.
त्याचा जीव कासावीस झाला.
"हे कशाला?"
"उद्या सकाळी नाश्ता कर."
"मनिषा, मला नकोत पैसे."
"मला तुझं उपाशी राहणं नको आहे."
"पण मी तुला परत कसे देणार?"
"तू मला प्रेम करतोस ना?"
"हो."
"मग झाले परत."
मनिषा सुनिलपेक्षा बारा वर्षांनी मोठी होती.
चाळिशी ओलांडलेली.
स्वतःच्या हिमतीवर उभी राहिलेली.
नोकरी, घर, गाडी...
सगळं होतं.
सुनिलकडे?
ना स्वतःचं घर.
ना बचत.
ना स्थिर भविष्य.
फक्त एक प्रामाणिक मन.
आणि म्हणूनच कदाचित मनिषा त्याच्या प्रेमात पडली होती.
एके दिवशी मनिषा पुण्यात आली.
सुनिल स्टेशनवर उभा होता.
हातात स्वस्तातला गुलाब.
मनात हजारो धडधडणारे प्रश्न.
मनिषा उतरली.
पांढरा ड्रेस.
चेहऱ्यावर साधं हसू.
तिने गुलाब घेतला.
क्षणभर पाहत राहिली.
"काय झालं?"
सुनिलने विचारलं.
"काही नाही."
"मग?"
"हा गुलाब माझ्या आयुष्यातला सर्वात महागडा आहे."
"अगं वीस रुपयांचा आहे."
"माझ्यासाठी अमूल्य आहे."
त्या दिवशी दोघे दिवसभर फिरले.
चहा.
गप्पा.
हास्य.
आठवणी.
संध्याकाळी नदीकाठी बसले होते.
मनिषा अचानक म्हणाली,
"सुनिल, तुला माझ्याबद्दल कधी भीती वाटत नाही?"
"कशाची?"
"मी तुझ्यापेक्षा मोठी आहे."
"मग?"
"लोक काय म्हणतील?"
सुनिल हसला.
"लोकांनी माझं आयुष्य जगायचं आहे का?"
"नाही."
"मग त्यांना बोलू दे."
मनिषाच्या डोळ्यात पाणी आलं.
ती पहिल्यांदाच सुनिलच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली.
पण प्रत्येक प्रेमकथेत एक वादळ असतं.
आणि त्यांच्याही आयुष्यात ते येणार होतं.
एका रात्री मनिषाचा फोन आला.
आवाज थरथरत होता.
"सुनिल..."
"काय झालं?"
"मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे."
"बोल."
"माझ्या घरी आपल्या नात्याबद्दल कळलंय."
सुनिलचं हृदय धडधडलं.
"मग?"
"खूप विरोध होतोय."
"किती?"
"इतका की मला तुझ्याशी बोलणं बंद करायला सांगितलं आहे."
क्षणभर सुनिलला काहीच सुचलं नाही.
"आणि तू?"
मनिषा काही बोलली नाही.
फक्त रडत राहिली.
सुनिलने डोळे मिटले.
त्याला पहिल्यांदाच जाणवलं.
गरिबीशी लढणं सोपं असतं.
पण समाजाशी लढणं खूप अवघड असतं.
त्या रात्री फोन कट झाला.
आणि दुसऱ्या दिवशी...
मनिषाचा फोन बंद होता.
मेसेज नाही.
कॉल नाही.
ऑनलाईन नाही.
एक दिवस.
दोन दिवस.
तीन दिवस.
सुनिल वेडा होऊ लागला.
चौथ्या दिवशी दारावर टकटक झाली.
त्याने दार उघडलं.
समोर एक कुरिअर बॉक्स होता.
त्यावर फक्त दोन शब्द लिहिले होते
"तुझी मनिषा."
आत काय होतं?
आणि मनिषा अचानक कुठे गायब झाली होती?
हे सुनिलला अजून माहित नव्हतं !
पुढील प्रकरणात "कुरिअर बॉक्समधील गुपित",
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
