Login

आपलं घर - भाग -1

Aapl Ghar

आपलं घर  - भाग -  1


    अहो, मी काय म्हणतेय, आपण वेदुकडे जाऊयात नां, ती एवढी म्हणतेय तर आपण ऐकूयात नां तिचं, सरलाताई सुहासरावांना बोलतं होत्या.


    आज तुम्ही बँकेत गेला होतात नां, तेव्हा आली होती वेदा, तुमची वाट बघत बसली होती, पण तुम्ही उशीर होणार आहे असं कळवल्यावर गेली ती.


  काय बोलतं होती, वेदु...कशी आहे, मुलं कशी आहेत.

   
     सगळी छान आहेत, वेदु नेहमीचंच बोलतं होती, माझ्याकडे कायमचं राहायला या तेंच, या वयात कशाला इथे असे दोघेचं राहताय असं.


     सुहासराव म्हणू लागले, आपलं घर सोडून असं मुलीकडे राहायला जाणं पटत नाही आहे मला, आणी तीने म्हणूंनं काय होतंय, जावयाने म्हंटल पाहिजे नां, वेदु म्हणतेय खरं घर बांधताना आधीच तीने उमेशला सांगून ठेवलं होतं की मी एकुलती एक आहे त्यामुळे सगळ्या सोयी असलेली एक मोठी रूम माझ्या आईवडिलांसाठी ठेवा असं, त्यांनी एक रूम गेस्टरूम सारखी ठेवलीही आहे, पण मला ते योग्य वाटतं नाही आहे नां, मुलगी एकुलती एक असली म्हणून काय झालं..


      सरलाताई म्हणू लागल्या, तुमचं हे नेहमीचंचं आहे, तिला काळजी असते आपली, वय झालंय आपलं, माझ्यासाठी बोलते ती, तुम्ही रिटायर होऊन बारा वर्ष झालीत, भांडी, लादीला बाई लावली असली तरी भाजी चिरणे, स्वयंपाक करणे, ही कामं मलाचं करावी लागतात नां, मला कधी आराम मिळणार मग, तुम्ही रिटायर होऊन आराम करताय आणी माझ्या वाटणीचं किचन काही सुटेना....  जाऊयात नां लेकीकडे, तिच्याकडे दोन, दोन मदतनीस आहेत, सुंदर मोठ्ठा बंगला आहे, आरामात राहवं लेकीकडे तर तुम्ही पण नां, माझं कधीच ऐकू नका..


    वेदु प्रेमाने बोलवतेय हे वेगळं आणी वास्तवात तिकडे जाऊन राहणे ह्यात फरक आहे गं, जास्त दिवस कोणाकडेही आपण गेलो की आपण त्यांना जड होणारंच, मुलीचं घर ते मुलीचंचं घर नां, सुहासराव म्हणाले.
   

   सरलाताई म्हणू लागल्या, आपल्याला मुलगा नाही नां, नां दुसरं अपत्य, मग आपण चेंज म्हणून एकुलत्या एक लेकीकडे जाणार नाहीतर कोणाकडे जाणार सांगा बरं तुम्ही.


  बरं बाई, तू हट्ट करते आहेस आणी निव्वळ तु म्हणते आहेस म्हणून एकदा जाऊयात, पण महिनाभरचं हा, त्यापेक्षा जास्त नाही...सुहासराव म्हणाले.


   शेवटी दुसऱ्या दिवशी सुहासरावांनी घराला कुलूप लावलं, आणी वेदुकडे जायला निघाले.


   वेदुकडे गेल्यावर पहिले काही दिवस खूप छान गेले, सरलाताई तर खूप खुश होत्या, कारण तिथे त्यांच्या दिमतीला नोकर होते.


   वेदुचा नवरा उमेशही सुरवातीला त्यांच्याशी अतिशय आदराने वागत असे, सुहासराव मनात म्हणू लागले, कदाचित मीच उमेशबद्दल चुकीचा विचार करत असेन, हा चांगला वागतोय अगदी


   पण दिवस सरत गेले आणी हळूहळू वातावरण बदलत गेलं.


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - हळूहळू उमेशच्या वागण्यातला बदल सुहासरावांना जाणवू लागतो, आणी त्यामुळे ते बदलू लागतात.)
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →